आपण नेहमीच हिंदी चित्रपटात बघत असतो कि धडाकेबाज पोलीस अधिकारी जो कुख्यात गुन्हेगाराला चकमकीत गोळी मारून त्याचा एन्काऊंटर करतो. एन्काऊंटर म्हणजे जर एखादा गुंड, गुन्हेगार, अतिरेकी जेव्हा पोलिसांना अटक करताना सहकार्य करत नसेल किंवा तो गुन्हेगार पोलिसांवर प्रतिहल्ला करतो किंवा पळून जायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला रोखण्यासाठी किंवा स्वतः चा जीव वाचवण्यासाठी पोलीस त्याच्या वर गोळी झडतात. त्यात तो ठार सुध्दा होऊ शकतो. वाचताना हे खूप सोपं वाटतं असलं तरी प्रत्यक्षात मात्र खूप धोकादायक आहे, कधी कोणाची गोळी कोणाचा जीव घेईल सांगता येत नाही.
असे एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलीस काही जणांना हिरो वाटतात तर काही त्यांना मानवाधिकार उल्लंघन करणारे समजून तुच्छ लेखतात. भारतात सध्या टॉपचे हे ७ एन्काऊंटर स्पेशियालिस्ट ऑफिसर आहेत त्यांच्या बद्द्ल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
१) प्रदीप शर्मा
सगळ्यात जास्त म्हणजे आजपर्यंत सरकारी नोंदणी मध्ये ११३ एन्काऊंटर ह्यांच्या नावावर आहेत. पण खरा आकडा ३१२ आहे अशी अफवा त्यांच्या बद्दल आहे. बरेच मोठे माफिया आणि अतिरेकी त्यांनी एन्काऊंटर केलेल्या यादीत आहेत. छोटा राजन आणि लखन भय्या यांच्या एन्काऊंटर मुळे प्रदीप शर्मा प्रकाश झोतात आले. एका मुलाखतीत ते म्हणले होते की, “मुंबईतील गँग आता पळापळ करतील, एन्काऊंटरचं मला व्यसन लागलंय, रविवारी तर खूप कंटाळतो मी.”
२) दया नायक
दया नायक सगळ्यात प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशलिस्ट असून त्यांच्या वर ३ हिंदी सिनेमे सुध्दा निघालेत, ‘अब तक छप्पन’, ‘कगार’, ‘डिपार्टमेंट’. आत्ता पर्यंत ३००च्या वर गुन्हेगारांना अटक तर ८३ एन्काऊंटर ह्यांच्या नावा वर आहेत.
३)प्रफुल्ल भोसले
मुंबई पोलिसांनी बनवलेल्या प्रसिद्ध असलेल्या ‘डेथ स्कॉड’ या गटात असलेले, गुन्हेगारी जगतात कुविख्यात (बाकीच्या जगासाठी प्रसिध्द) प्रफुल्ल भोसले हे त्यांच्या छोटा शकील, आरिफ कालिया एन्काऊंटरसाठी सगळ्यांना माहीत आहेतच. एकूण ९० एन्काऊंटर त्यांच्या नावावर नोंद झालेले आहेत पण खरा आकडा त्यापेक्षाही मोठा आहे असं लोक म्हणतात.
४) शहिद विजय साळसकर
अरुण गवळी गँग साठी वाईट स्वप्न असलेले विजय साळसकर यांनी आपल्या कारकिर्दीत ९० जणांना यमसदनी धाडले आहे. अतिरेकी अजमल कसाबशी झालेल्या चकमकीत २६ नोव्हेंबर २००८ रोजी त्यांना वीरमरण आले, मरणोत्तर अशोक चक्र देऊन भारत सरकारने त्यांच्या कामगिरीची पोचपावती दिली आणि सन्मान केला.
५) सचिन वझे
मुंबई पोलीस भरती मधून अगदी सर्वसामान्य सुरुवात केलेले वझे हे मुंबई मधील मुस्लिम बहुल असलेल्या मुब्रा भागात शांती राहावी म्हणून कामगिरी करत होते. मुन्ना नेपाळी, कृष्णा शेट्टी आणि इतर काही लष्कर ए तोयबाचे मदतगार त्यांनी ठार केले आहेत. त्यांचे सुरुवातीचे गुरू (आपल्या लिस्ट मधील नंबर १ ,प्रदीप शर्मा) यांच्या बरोबर वझे यांनी मुंबईतील हफ्तेखोर विरोधी पोलिसांचे दल उभारले, तसेच सचिन वझे यांनी आशिया खंडातील क्रेडीट कार्ड घोटाळा करणाऱ्याला सगळ्यात आधी १९९७ ला अटक केली. त्यांनी आतापर्यंत ६३ गुन्हेगार मारल्याचा रेकॉर्ड आहे, पण त्यांनी ह्या कामातून स्वेच्छेने निवृत्ती घेऊन त्यांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला.
६) रवींद्र आंग्रे
आत्ता पर्यंत ५१ गुन्हेगारांच्या एन्काऊंटरला जवाबदार असणारे आंग्रे हे ठाण्यातील माफिया आणि हफ्तेखोर यांना वचक ठेवणारे आहेत, असं म्हंटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. सुरेश मानचेकर याने तर आंग्रे यांना घाबरून आपली टोळी चालवणे बंद केले आणि तो पळून जायच्या प्रयत्नात होता पण त्याला आंग्रे साहेबांनी आपल्या बंदुकीने बरोबर टिपलं. ५० एन्काऊंटर झाल्यावर आंग्रेनी अर्धशतक झाल्याची पार्टी सहकाऱ्यांना दिली होती.
७) स्व. राजबीर सिंग
एकुलता एक ऑफिसर जो दिल्ली पोलीस दलातील फक्त १३ वर्षांच्या सर्विस मध्ये ACP झाला होता. त्यांनी दिल्ली लॅण्ड माफियांची कंबर मोडून ठेवली. त्यांचा एन्काऊंटरचा आकडा ५० च्या पार झाला होता, पण दुर्दैवाने त्यांच्याच एका मित्राने प्रॉपर्टीच्या वादातून त्यांच्या वर गोळी झाडून त्यांचा खून केला.