“हे सिनेमे नाकारल्याचा अजय देवगनला आज नक्कीच पश्चाताप होत असणार, तुम्हाला काय वाटते ?”
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण यांनी आतपर्यंत एकूण १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे, आणि त्यामधील असे काही चित्रपट आहेत ज्यामुळे अजय देवगण यांचा वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या निरनिराळ्या भूमिका, त्यांनी केलेले स्टंट्स यामुळे त्यांचा हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये चांगला जम बसला आहे.
त्यांच्यामधील अभिनयाच्या कौशल्यामुळे अनेक दिग्दर्शक त्यांना त्यांच्या चित्रपटामध्ये घेण्यासाठी इच्छुक होते. पण असे काही चित्रपट आहेत, ज्यामध्ये अजय देवगण यांनी काम करण्यासाठी दिग्दर्शकांना साफ नकार दिला होता. तुम्हाला जाणून घ्यायचे असेल कि, नक्की हे कोणते चित्रपट होते ज्यामध्ये त्यांनी काम करण्यास नकार दिला, हे जाणून घेण्यासाठी खाली त्या चित्रपटांची यादी दिली आहे.
१) करण – अर्जुन
‘करण अर्जुन’ हा चित्रपट शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या करियरमधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या चित्रपटामध्ये सर्वकाही समाविष्ट होते जसे कि, चांगले संगीत, ड्रामा, ऍक्शन इत्यादी. तथापि, जर अजय देवगण याने हा चित्रपट करण्यास नकार दिला नसता तर हा चित्रपट सलमान खानसाठी कधीच कास्ट झाला नसता, कारण, राकेश रोशन यांची शाहरुख खानचा भाऊ म्हणून म्हणजेच करण म्हणून पहिली निवड अजय देवगण होती, परंतु, या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन आणि अजय देवगण यांची केमिस्ट्री काही कारणांमुळे जमली नाही, म्हणून देवगण या चित्रपटाच्या प्रकल्पातून बाहेर पडले.
२) डर
दिग्दर्शक यश चोप्रा व अजय देवगण यांच्यामध्ये तितके चांगले नाते नव्हते. ९० च्या काळामध्ये यश चोप्रा, अजय देवगण यांना त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये घेऊ इच्छित होते. यश चोप्रा यांना ‘डर’ या चित्रपटामध्ये अजय देवगण यांना राहुल या भूमिकेसाठी कास्ट करायचे होते, पण अजय देवगण तेव्हा उटीमध्ये दुसऱ्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते, त्यामुळे त्यांनी यश चोप्रा यांच्या प्रपोजलला कोणताच प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे हा चित्रपट शाहरुख खान यांच्याकडे गेला.
३) बाजीराव – मस्तानी
संजय लीला भन्साळी यांचा सर्वात हिट ठरलेला चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’. रणवीर सिंग, दीपिका पदुकोन, आणि प्रियांका चोप्रा यांनी केलेल्या उत्तम अभिनयामुळे हा चित्रपट यशस्वी झाला. परंतु, तुम्हाला हे माहिती आहे का कि, या चित्रपटामध्ये रणवीर सिंग यांनी केलेली ‘बाजीराव’ ची भूमिका साकारण्यासाठी संजय लीला भन्साळी यांनी अजय देवगण यांना निवडले होते. अजय देवगण यांना मुख्य भूमिका देण्यात आली होती पण, देवगण यांना काही नियम व अटी मान्य नव्हत्या, त्यामुळे पैशांचा व्यवहार व देण्यात येणाऱ्या तारखांमुळे अजय देवगण यांनी या भूमिकेसाठी व चित्रपटासाठी नकार दिला.
४) कुछ कुछ होता है
‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट आजही तरुणाईचा आवडता चित्रपट आहे. अजयने देवगण व काजोल यांनी सोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. जसे कि, ‘प्यार तो होना हि था’, ‘इश्क’, ‘राजू चाचा’. या चित्रपटात सुद्धा अजय देवगणला काजोलसोबत काम करण्याची संधी होती. परंतु, अजय देवगण या चित्रपटातून बाहेर पडला असे कळते.