लाखो यहूदी लोकांचा नाहक जीव घेणार्या या क्रूर हिटलरला इतिहासात एका भारतीय व्यक्तीपुढे झुकावं लागलं होतं. पण कोण होता तो भारतीय माणूस ?
आज आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला जगाच्या इतिहासात सर्वात क्रूर शासक म्हणून ओळखले जाते, ज्याच्या महत्वाकांक्षेपुढे भलेभले राष्ट्र झूकले होते. पण हिटलर जेवढा क्रूर होता, तेवढाच तो मनाने भित्रा सुध्दा होता. याच भित्रेपणामुळे शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली. लाखो यहूदी लोकांचा नाहक जीव घेणार्या या क्रूर माणसाला इतिहासात एका भारतीय व्यक्तीपुढे झुकावं लागलं होतं. पण कोण होता तो भारतीय माणूस ? असं काय झालं की ज्यामुळे हिटलर सारख्या निर्दयी माणसाला झूकावं लागलं ? हे सगळ आपण या लेखात पाहणार आहोत, म्हणून लेख शेवट पर्यंत वाचायला विसरू नका.
कोण होता हिटलर
एडॉल्फ हिटलर हा सुरूवातीला एक सामान्य माणूस होता. त्याने सुरूवातीला पडेल ती कामे करून आपला उदरनिर्वाह चालवला. सायबेरिया आणि ऑस्ट्रीयाच्या वादाने पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि या वादाने पहिल्या महायुद्धाचे स्वरूप धारण केले. या युध्दाच्या ठिणगीने हिटलरला सैन्यात भरती होण्यास भाग पाडले. हिटलर हा सैन्यात सुध्दा एक साधा शिपाई होता, पण त्याकाळी फ्रान्सचा नेपोलियन, इटलीचा मुसोलिनी, तुर्कीचा केमालपाशा या हूकूमशहांचा दरारा राजकारणात होता. याचाच परिणाम हिटलरवर झाला. हिटलर तर इटलीच्या मुसोलिनी या हूकूमशहाला खुप मानत होता.
त्याने दाखवलेल्या तत्वांना अनूसरूनच त्यानं नाझी पक्षाची स्थापना केली, आणि आपल्या प्रचंड महत्वकांक्षी धोरणाने जर्मनीची सत्ता आपल्या हातात घेतली. त्याचं म्हणणं होतं की जर्मन लोक हे “आर्य” वंशाचे आहेत, आणि हा वंश जगातील सर्वोच्च वंश आहे. या वंशाने जगावर राज्य करावे, हे या वंशाचे कर्तव्य आहे. त्याचा यहूदी लोकांवर प्रचंड राग होता. त्याने यहूदी लोकांना दिलेली वागणूक जगजाहीर आहे. त्याचं म्हणणं होतं की, यहूदी लोक हे व्यभिचारी आणि अधर्मी आहेत, त्यांना जगण्याचा आधिकार नाही.
पण अशी प्रचंड महत्त्वकांक्षा असलेला माणूस, ज्याचा, त्याकाळातील राजकारणावर प्रचंड दबदबा होता, त्याला सुध्दा कुणाची तरी माफी मागावी लागल्याचं इतिहासात आपल्याला पहायला मिळतं आणि तो माणूस भारतीय होता हे विशेष. तो भारतीय नेता म्हणजे आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष, नेताजी सुभाषचंद्र बोस. हो ! ह्या धगधगत्या लाव्यासमोर हिटलरला झूकावं लागलं होतं.
का मागितली हिटलरने नेताजींची माफी ?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासंदर्भात हिटलरची भेट घेतली होती. “शत्रुचा शत्रु तो आपला मित्र” या उक्तीप्रमाणे हिटलरला आपल्या बाजूने करून घेण्याचा त्यांचा मानस होता, पण त्याकाळी हिटलरने आपलं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि त्या पुस्तकात त्याने भारत व भारतीय लोकांविषयी आपत्तीजनक लिखाण केलं होतं. ही बाब नेताजींना अजिबात आवडलेली नव्हती. हिटलरच्या भेटीच्या वेळी त्यांनी आपली नाराजी हिटलर समोर तीव्र शब्दात बोलुन दाखवली. त्यावर हिटलरने नेताजींसमोर आपण केलेल्या लिखानाबाबत माफी मागितली आणि दिलगिरीही व्यक्त केली.
भारतीय खेळाडूपुढे हिटलर तोंडघशी पडतो तेव्हा
हा काळ होता सन 1939 चा. जर्मनीमध्ये ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये भारतीय खेळाडू सुध्दा सामिल झाले होते. त्यातच भारत आणि जर्मनी ह्यांच्यादरम्यान हॉकीची मॅच होती. मैदानात भारताकडून मेजर ध्यानचंद व त्यांचे सहकारी होते. अर्थातच, ध्यानचंद यांच्या तुफानी खेळाने जर्मनीचा 6-1 असा दारून पराभव झाला. ही मॅच बघण्यासाठी हिटलर तेथे उपस्थित होता.
त्याला ध्यानचंद यांची खेळी खुपच आवडली. त्याने त्यांना बोलावून आपल्या सैन्यात उच्चपदाची नोकरी देऊन आपल्यासाठी खेळण्याचा प्रस्ताव ध्यानचंद यांच्यासमोर ठेवला होता, पण कट्टर देशप्रेमी असलेल्या मेजर ध्यानचंद यांनी त्याचा हा प्रस्ताव फेटाळून लावला, आणि अशा तऱ्हेने हिटलर, मेजर ध्यानचंद याच्या समोर तोंडघशी पडला.
हिटलरचं पहिलं प्रेम
हिटलरचा यहूदींवरचा राग जगजाहीर आहे आणि त्याची त्यांच्या विषयीची विचारसरणी सुध्दा जगाला माहीती आहे, पण यहूदींना अक्षरशः शिव्या घालणारा हा माणूस शेवटी प्रेमात सुध्दा एका यहूदी तरूणीच्याच पडला. जग हलवणारा हा हूकूमशहा आपलं प्रेम व्यक्त करण्यास मात्र खुप घाबरला आणि शेवटपर्यंत बोलु शकला नाही. इतक्या लोकांची हत्या करणारा माणूस, जेंव्हा आपण हरणार असं त्याच्या लक्षात आलं, तेव्हा त्याने आत्महत्या करून स्वतःच जीवन संपवलं. हा हुकूमशहा ज्या यहूदी तरूणीच्या प्रेमात पडला होता, तिचं नाव होतं “इवा ब्राऊन”. नंतर ती “इवा हिटलर” म्हणुन जगासमोर आली. तर ही होती जगात सर्वात क्रूर समजल्या जाणाऱ्या हिटलरची “द अन टोल्ड स्टोरी”