“लई भारी”च्या आखाडा मध्ये आज आहेत लालूप्रसाद, आणि यामध्ये आपण जाणून घेणार आहे उदय लालूंचा. लालूप्रसाद यादवांच्या राजकीय जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग, ज्यामध्ये त्यांनी शत्रू पक्षाला रातोरात उध्वस्त केले आणि मग पुन्हा मागे पहिलेच नाही.
हा किस्सा बिहारचा राजकारणाशी निगडित आहे, काही वर्ष अगोदर बिहारचे सर्वेसर्वा होते. वर्ष होते 8 मार्च 1990. गंगेच्या किनाऱ्यावरील ब्रिज किशोर हॉल, हा हाल त्याकाळी जरा झोकात होता कारण 27 फेब्रुवारी 1990 रोजी बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागला होता 324 सदस्य असलेल्या बिहारच्या विधानसभेत 120 विधायक समेत जनता दल सगळ्यात मोठा पक्ष बनला होता.
जवळपास 20-22 CPI चे उमेदवार, 7-8 CPL चे ,19 झारखंड मुक्ती दलाचे तर काही अपक्ष उमेदवार निवडून आली होती व या सगळ्यांनी जनता दल पक्षाला समर्थन दिले होते, तर अशात एक बाब स्पष्ट होते की जो जनता दलाचा प्रमुख नेता बनेल तो जगन्नाथ मिश्र नंतर बिहारचा पुढील मुख्यमंत्री बनेल.
मुख्यमंत्रीपदासाठी दोन प्रमुख नावे होती ,पहिले रामसुंदर दास व दलित नेता जे की कर्पूरी ठाकुर नंतर 1979 च्या काळात 384 दिवसासाठी बिहारचे मुख्यमंत्री बनले होते. त्यांना तत्कालीन देशाचे प्रधानमंत्री “विश्वनाथ प्रताप सिंह” चे समर्थन होते आणि हे समर्थन जनता दलचे दुसरे एक नेता लालू यादव यांची डोकेदुखी वाढवीत होते.
ही घटना खोलवर समजून घेण्यासाठी आपल्याला काही काळ मागे जावे लागेल जेव्हा जनता दल पक्षात फुटाफूट झाली होती त्यानंतर त्या पक्षाचे नेतृत्व कर्पूरी ठाकूर यांनी केले होते. फेब्रुवारी 1988 मध्ये कर्पूरी ठाकुर चे निधन झाले त्यानंतर जनता दलचे विधायक बनण्यासाठी अनेक नावे समोर येत होते पण तोपर्यंत सोनेपुर चा एक विधायक दिल्लीत आपल्या या पक्षाचे नेतृत्व मिळविण्यासाठी हालचाली वाढवल्या होत्या त्याचे नाव होते “लालूप्रसाद यादव”.
त्या काळात लालूप्रसाद यादव जनता दलाच्या प्रत्येक सभेत अगदी आवर्जून हजेरी लावीत, जोरदार भाषणे ठोकत कधी म्हणत की, व्हि.पी सिंह चा विरुद्ध थांबणारा कोणी राक्षसच असू शकतो, तर कधी चंद्रशेखर वर आपले स्तुतीसुमने उधळत असत.
लालूप्रसाद यादव सत्य मध्ये आपली हिस्सेदारी मिळवण्यासाठी आता जास्त कळत थांबू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी स्वतःच कर्पूरी ठाकुर यांची विरासत त्यांच्याकडेच सोपवण्यात यावी असा दावा केला व कर्पूरी ठाकुर च्या मृत्यूनंतर जनता दल पक्षाचे सर्वेसर्वा बनले.पक्षाचे सर्वेसर्वा बनण्यासाठी त्यांनी आपले सहयोगी गुरूसमान अनुप यादव यांना पिछाडीवर टाकले.
पुढे 7 मार्च 1990 रोजी तत्कालीन प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंह यांनी तीन पर्यवेक्षक पटना येथे पाठवले. कारण त्यांना नवीन नेता योग्यप्रकारे नेमायचा होता या तिघात सगळ्यात प्रमुख होते “अजित सिंह” जे की व्हि.पी सिंह च्या दरबारात आपली प्रतिमा उंचाविण्याच्या तयारीत होते अजित सिंह सोबत जॉर्ज फर्नांडिस तसेच सुरेंद्र मोहन सुद्धा होते.
लालूप्रसाद यादव यांना कळून चुकले की हे तिघेजण हे आपल्यासाठी एक वाईट काळ बनून येत आहेत ते सरळ बिहार मधील प्रतिष्ठित राजनेता देवीलाल जवळ पोहोचले व देवीलाल यांच्या इशाऱ्यावर मुलायम सिंह यादव, शरद यादव हेही परिक्षक बनून पटना येथे दाखल झाले.
8 मार्च रोजी बिहारचा राजभवनात दिवसभर राजनीति गतिविधि पार पडल्या बिहारचे तत्कालीन गव्हर्नर “मोहम्मद युनुस सलीम” हे होते. लालूंचा या गतिविधि दरम्यान अनुप यादव व नारायण यादव यांनी जबरदस्त विरोध केला. त्यांनी लालूंच्या ऐवजी राम सुंदर दास या नावाची शिफारस केली. आता लालूप्रसाद यादवांना वाटू लागली की आपण पूर्णपणे पिछाडीवर जाऊ त्यावेळी ते चंद्रशेखर जवळ गेले. त्यांनी चंद्रशेखर यांना त्याच रात्री फोन केला व म्हणाले बापूसाहेब आता तुम्ही काही केले नाही तर व्हि.पि सिंह चा माणुस बिहारच्या गादीवर विराजमान होईल.
चंद्रशेखर व व्ही.पी सींह मध्ये काही बाबीवरून मतभेद होते त्यांना पिछाडीवर टाकण्यासाठी ते काहीही करू शकत होते. तेव्हा चंद्रशेखर यांनी आपली चेले “रघुनाथ झा” यांच्याशी चर्चा करून या मार्गावर तोडगा काढण्यासाठी सांगितले “रघुनाथ झा” सांगण्यावरून राजभवनात मतदानाच्या साह्याने विधायक निवडण्याचे ठरवले त्यात 120 जनता दलचे विधेयक 5 विधान परिषदेने निवडलेले विधायक व 2 अपक्ष विधायक एकूण 127.
राजभवनात मतदान सुरु झाली एक गट राम सुंदर चा समर्थनात तर दुसरा लालूंच्या समर्थनात नारेबाजी करत होता. 12 मते मिळाली रघुनाथ झा यांना, 59 मते लालूला तर 56 मोतीराम सुंदर यांना मिळाली व अशाप्रकारे लालूप्रसाद यादव बिहारचे 25 वे मुख्यमंत्री बनले.